धर्माची/संस्कृतीची
निर्मिती का केली किंवा कशी झाली? या
प्रश्नासाठी आपल्याला इतिहासात जाव लागेल. विचार करूयात कि पृथ्वीवर माणूस अजून
यायचा आहे, तर पृथ्वीवर आत्ता डायनासोर आहेत आणि त्याचं निर्विवाद वर्चस्व आहे. मग
एक फार मोठा उल्कापात झाला आणि त्या उल्कापातामुळे पृथ्वीचं वातावरण ढवळून निघालं,
जंगले पेटली, ज्वालामुखी फुटले, भूकंप झाले आणि पृथ्वी हिमयुगात पोहचली. या सगळ्या
घटनेमुळे पृथ्वीवरून डायनासोर नष्ट झाले. पुढे काही हजार वर्षांनी माकडांपासून
मानवाची उत्क्रांती झाली. हि उत्क्रांती कशी झाली या बद्दल बरंचस माहिती नाहीये,
उत्क्रांती साठी लागणाऱ्या माकड आणि मानव या मधल्या बऱ्याचश्या कड्या गायब आहेत
आणि या उत्र्कांतीचा वेगही अपेक्षेपेक्षा जास्त आहे. एक अशीही विचारसरणी आहे कि
प्राचीन काळी काही बुद्धीजीवी परग्रही इथं आले होते त्यांनी इथल्या माकडांच्या
जनुकामध्ये आपली काही जनुके मिसळून मानवजातीची निर्मिती केली. काही का असेना पण एक
गोष्ट मात्र नक्की आहे कि मानवाचं पृथ्वीवरील अस्तित्व फार अलीकडच म्हणजे २०-३०
हजार वर्षांचं असावं. आता तेंव्हाच्या आदीवासी लोकांची राहणीमान कस असावं? त्यांची
संस्कृती कोणती?
अश्मयुग, तांब्रयुग
आणि लोहयुग, अस आपण इतिहासाच्या पुस्तकात मानवाच्या इतिहासाबद्दल वाचलंय.
अश्मयुगात(stone age) धर्म
तयार झाले नसावेत, असतील तर त्याबद्दल माहिती नाही. त्याकाळी माणूस टोळक्याने
राहायचा, वेगवेगळ्या जमाती असायच्या. अभ्यासकांच्या मते तेंव्हा माणूस गुहेत
राहायचा, अंगावर पाला किंवा जनावरांची कातडी पांघरायचा, कंदमुळे आणि जनावरे जे
मिळेल ते खायचा. शिकारी करता त्याला हत्यारे माहित नव्हती, दगडाने शिकार करायचा. त्या
काळी त्याचा एकच धर्म होता, जगणे. तो भटकायचा, अन्न मिळवायचा, नैसर्गिक आसरा
शोधायचा, आपली पिढी बनवायचा, तो फक्त जगायचा. त्यावेळी त्याने नैसर्गिक
गोष्टी उदा. पाऊस, वीज, वादळ, वणवा(आग), संसर्गजन्य आजार इ. बघितले असणार पण त्या विषयी
काहीच ज्ञान नव्हतं त्याला. अश्या गोष्टीमुळे एक तर इजा व्हायची किंवा मृत्यू
व्हायचा. साहजिकच तो यांना घाबरायला लागला. त्याने ह्या सर्वांचं निरीक्षण/आकलन
करायला सुरु केलं असणार. सुरुवातीला ह्या गोष्टींचा तर्क लावायला त्याला आलं
नसावं. ते का होतय हे कळाले नसावे. मग त्याने ह्या गोष्टींना दैवी मानायला सुरु
केलं असणार. तो या ताकदींना पुजायला लागला असणार. त्या शक्तींपासून त्रास होऊ नयेत
म्हणून त्याने काही विधी तयार केले असणार, काही नियम बनवले असणार, इथंच धर्माचा
पाया घातला गेला असणार, त्या नियमात, त्या रूढी-परंपरेत पिढी दर पिढी वाढ होत
असणार. त्यात तर्कसंगती कमी तर श्रद्धा-अंधश्रद्धेचा प्रभाव जास्त असणार.
पुढे माणसाने
वेगवेगळी दगडी हत्यारे तयार केली, आगीचा वापर सुरु झाला, चाकाचा शोध लागला, शेती
करायला लागला, धातूचा शोध लागला आणि हत्यारे धातूची बनली. माणूस तांब्रयुगात(bronze age) पोहोचला. ह्याच काळात प्राचीन संस्कृती अस्तित्वात होत्या उदाहरणार्थ दक्षिण
अमेरिकेत मायन, प्राचीन ग्रीक, प्राचीन रोमन, प्राचीन इजिप्तिअन संस्कृती, प्राचीन
वैदिक/आर्य संस्कृती. या संस्कृती कोणी एका माणसाच्या विचारावर चालत नव्हत्या तर
त्या पिढी दर पिढी चालत असलेल्या रूढी-परंपरेवर आधारित होत्या. ह्या काळात माणूस
बऱ्यापैकी स्थिरावला, त्याने गावं-नगरे बनवली, त्याची कला, कारीगिरी सुधारली, तो
जनावरं पाळू लागला, घोडा-बैलगाडी हे त्याचे वाहने झाली. कारीगिरी सुधारल्यामुळे
चांगल्या दर्जाची हत्यारे त्याने बनवली आणि तो आणखी ताकदवर बनला. त्याने देवांच्या
मुर्त्या बनवल्या प्रार्थनास्थळे बनवली. समाजाचे स्तर बनले, त्या काळच्या सर्व
संस्कृतीत साधारतः राजा, धर्मगुरू, सैनिक, व्यापारी, कारागीर, शेतकरी असे समाजाचे
वर्गीकरण दिसायचे. बऱ्याचदा धर्मगुरू हाच राजा असायचा, तोच न्यायनिवाडा करायचा.
त्याने नियम बनवले असायचे. हे नियम पारंपारिक रूढी-परंपरेच्या पार्श्वभूमीवर
आधारित असायचे.
बहुतांश
संस्कृतीमध्ये अनेक देव असत. त्या देवांना खुश(प्रसन्न) करण्यासाठी किंवा त्यांचा
कोप होऊ नये म्हणून बऱ्याच प्रथा होत्या. बहुतेक सर्वच धर्मामध्ये ईश्वराला खुश
करण्यासाठी काही तर अर्पण करण्याची प्रथा होती. त्यातल्या बऱ्याच विदारक होत्या
कारण त्यात ईश्वराला बळी देण्यासाठी मनुष्याचा वापर फार मोठ्या प्रमाणात होता, उदा.
माया लोकं सूर्यग्रहणादिवशी देवाला शांत करण्यासाठी माणसांचा बळी द्यायचे, त्यांचे
जिवंतपणी छाती फाडून धडधडते हृदय ईश्वराला अर्पण करायचे. काही संस्कृतीच्या उत्ख्ननात
बळी दिलेल्या हजारो कवट्या सापडल्या आहेत ज्या एका ठिकाणी साठवून ठेवलेल्या
आहेत. काही ठिकाणी तर लहान मुलांना बळी
द्यायचे. कारण काय तर लहान मुलं निरागस असतात आणि त्यांचा बळी दिल्यावर परमेश्वर
खुश होतो म्हणे. या विषयावर बरचसं संशोधन गेली अनेक वर्षे चालू आहे. जर या विषयावर
documentry बघायचं असेल तर YouTube वर Ancient beliefs
and sacrifices हा विडियो https://www.youtube.com/watch?v=gHzsqlP8H3Q&list=WL&index=2 ह्या लिंकवर बघा. एक गोष्ट नक्की
होती सर्व धर्मांमध्ये एक उच्च धार्मिक व्यक्ती होती आणि ती धर्माशी निगडीत नियम
सांगत असे आणि त्यानुसार न्यायनिवाडा करत असे. त्या व्यक्तीच्या शब्दाला
अनन्यसाधारण महत्व असे, कारण सामान्य व्यक्तीच्या मते ती व्यक्ती परमेश्वराशी संवाद
करू शकत होती. त्या व्यक्तीचा शब्द म्हणजे ईश्वराचा शब्द मानला जायचा. या गोष्टीमुळे ती
व्यक्ती ताकदवर बनली. तिच्या हातात सत्ता आली. अशी व्यक्ती काहीही करू शकते. समाजाला
आपल्या बोटावर नाचवू शकते.
क्रमशः